83 कोटींचा पूल, पण पुलाचा शेवट होतो थेट शेतकऱ्याच्या शेतात, येलदरीच्या पुलाबाबत नेमकं काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, 83 कोटींचा पूल, पण पुलाचा शेवट होतो थेट शेतकऱ्याच्या शेतात, येलदरीच्या पुलाबाबत नेमकं काय घडलं? |
83 कोटींचा पूल, पण पुलाचा शेवट होतो थेट शेतकऱ्याच्या शेतात, येलदरीच्या पुलाबाबत नेमकं काय घडलं?

हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल पूर्णा नदीवर बांधण्यात आलाय. 83 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आलाय.

सामान्यपणे ज्यावेळेस एखाद्या पुलाचं बांधकाम होतं आणि पूल जेव्हा संपतो त्यावेळेस रस्ता सुरू होतो.

पण इथं जिथं पूल संपतो त्याच्यानंतर कुठलाही रस्ता नाही, तर थेट एका शेतकऱ्याचं शेत सुरू होतं. पण यामागचं कारण काय आहे? पाहा हा रिपोर्ट.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे, अमोल लंगर

एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)